छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित "अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे" राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न!

 पुढील काळात अंतराळातील संशोधन  टेक्नॉलॉजीचे नेतृत्व छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी करेल  तर खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होईल! :- डॉ. नंदकिशोर जोशी 

 कल्याण प्रतिनिधी)नुकत्याच अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे, या राष्ट्रीय शिक्षक धोरण 2020 अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे संपन्न झाली.

 छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार करून व माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करण्यात आले. 


या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष पाटील विज्ञान भारती प्रांत कार्यकारिणी सदस्य हे  म्हणून उपस्थित होते. विज्ञान प्रतिकृतीचे उद्घाटन  कार्यक्रमाचे अतिथी सुभाषजी पाटील यांच्या हस्ते तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान गीताने करण्यात आले. या वेळी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण  अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे, चिटणीस मीनाक्षी  घागरे,  प्राथमिक विभाग सरचिटणीस भारती वेदपाठक, कार्याध्यक्ष नारायण फडके, श्रीकांत तरटे, संस्था पदाधिकारी तसेच NEP समन्वयक उर्मिला जाधव, स्पर्धाप्रमुख अर्पिता कानेटकर, नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, व अन्य शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व विद्यार्थी, उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या रायगड पालघर ठाणे तीन जिल्ह्यांची सहा विभागात  निवड झालेल्या उत्कृष्ट 42 विज्ञान प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती.

 विद्यार्थ्यांना वैज्ञानिक गोडी निर्माण व्हावी विज्ञानाच्या सखोल अभ्यास व्हावा विज्ञान प्रश्नमंजुषा आतापर्यंत आयोजित आयोजित करण्यात येत होते परंतु अधिक गुणवत्ता असलेले असलेली सृजनशील विद्यार्थी शोधून त्यांना पुढे आणणे या NEP च्या उद्दिष्टानुसार गतवर्षीनुसार या स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना त्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवता याव्यात   त्यांना मृत स्वरूप देण्यासाठी वर्ष 2023-24 पासून अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे या संकल्पना मांडण्यात आली. सदर स्पर्धेच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या शाळा स्तरावर पहिली फेरी संस्थेच्या 57 शाळांमधून सुमारे 787 इतके विक्रमी  विज्ञान प्रकल्प मांडण्यात आले होते त्यातील 151 प्रकल्पांची विभाग स्तरावर मांडणी करण्यात आली होती ठाणे,रायगड, पालघर, या तीन जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या एकूण सहा विभागात  निवड झालेल्या समाजपयोगी निवडक उत्कृष्ट 42 प्रकल्पाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.



विज्ञान प्रकल्पांमध्ये  इयत्ता सहावी मध्ये प्रथम क्रमांक विवेकानंद संकुल सानपाडा प्राथमिक विद्यालय इंग्रजी, प्रकल्प स्मार्ट सिटी,

 द्वितीय क्रमांक नूतन ज्ञान मंदिर कल्याण प्रकल्प मल्टी टास्किंग सोलर सेशन, तृतीय क्रमांक विवेकानंद संकुल सानपाडा प्राथमिक मराठी विद्यालय प्रकल्प अपारंपारिक ऊर्जा निर्मिती,  तर, उत्तेजनार्थ क्रमांक विद्या मंदिर मांडा टिटवाळा प्रकल्प हायड्रोपॉवर, यांना देण्यात आला. 

इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांक,विवेकानंद संकुल सानपाडा इंग्रजी, प्रकल्प अंध लोकांसाठी स्मार्ट चष्मा,तर द्वितीय क्रमांक सरस्वती विद्यामंदिर सायले, प्रकल्प वनऔषधी वनस्पती उपयोग, तर तृतीय क्रमांक विद्या मंदिर मांडा टिटवाळा प्रकल्प स्मार्ट सिटी, तर उत्तेजनार्थ जनता विद्यालय प्रशाला दहिवली कर्जत प्रकल्प औषधी वनस्पती, यांना देण्यात आला. 

 इयत्ता आठवी मध्ये प्रथम क्रमांक विक्रमगड हायस्कूल, प्रकल्प गाड्यांच्या धुरापासून साई निर्मिती तर, द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा, प्रकल्प ग्रीन सोलार सिटी, तृतीय क्रमांक विद्यामंदिर मांडा टिटवाळा  प्रकल्प कार्बनप्युरिफिकेशन, तर उत्तेजनार्थ नूतन ज्ञानमंदिर कल्याण, प्रकल्प स्मार्ट लगेज ट्रॅव्हलर, यांना देण्यात आला.

 इयत्ता नववी प्रथम क्रमांक नवजीवन विद्यामंदिर कल्याण प्रकल्प कचऱ्यापासून वीजनिर्मिती,द्वितीय क्रमांक जनता विद्यालय धसई प्रकल्प औषधी वनस्पती उपयोग, तर तृतीय क्रमांक अभिनव ज्ञानमंदिर उसर खुर्द ता.तळा, तर उत्तेजनार्थ विद्या मंदिर मांडा टिटवाळा प्रकल्प औषधी वनस्पतीचे उपयोग  यांना देण्यात आला विजेत्या प्रकल्प विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

 यावेळी विज्ञान प्रकल्प परीक्षक म्हणून प्रा.सुमन अय्यर बिर्ला कॉलेज HOD, प्रा.गोपा गणेश  बिर्ला कॉलेज पीजेटी,प्रा.नरेंद्र गोळे, भाभा अणुसंशोधन केंद्र अभियंता विभाग. मोमीन सादिया मॅडम हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.

 पुढील काळात अंतराळातील संशोधन  टेक्नॉलॉजीचे नेतृत्व छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी करेल  तर खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होईल!:- डॉ. नंदकिशोर जोशी 

 छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर जोशी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की पुढील काळामध्ये अंतराळातील संशोधन टेक्नॉलॉजीमध्ये नेतृत्व छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी करेल तरच खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होईल असे  अध्यक्षीय भाषणात आपले मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की. "मागेल त्याला शिक्षण" हे  व्रत घेऊन संस्थेने जिथे शिक्षणाची गरज आहे तिथे पाऊल टाकून शिक्षणापासून वंचित असलेल्यांना  शिक्षण देण्याचे कार्य संस्था1960 पासून ठाणे, पालघर, रायगड, या जिल्ह्यांमध्ये 57 शाळा असून अनेक आदिवासी भागांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून हे पवित्र ज्ञानदानाचे कार्य  छत्रपती शिक्षण मंडळ करत आहे. 

तसेच अनेक सामाजिक प्रश्न बुद्धीच्या व विज्ञानाच्या माध्यमातून कसे दूर करता येतील तसेच  साहित्य, विज्ञान, पर्यावरण, या तीन विषयांच्या  माध्यमातून समाजात परिवर्तन घडले पाहिजे आणि याचा एक आविष्कार आम्ही  विज्ञान प्रदर्शनांमध्ये बघितला विज्ञानातील अनेक आविष्कार या विज्ञान प्रदर्शनात पाहायला मिळाले असेच सुंदर चांगले प्रकल्प या ठिकाणी उभे केले 787 एकूण प्रकल्प भाग घेतले होते विभाग विभागात 151 विभाग पातळीवर आले 42 प्रकल्प आता अंतिम फेरीसाठी आहे  आहेत हे सर्व प्रकल्प पाहून खूप आनंद झाला चांगले विषय घेतले होते. औषधी वनस्पती, शेती, सेंद्रिय खते, कीटकनाशके, सौर ऊर्जा, कचऱ्यापासून वीजनिर्मिती  याबाबत अनेक विषय मांडले होते त्याचा समाजाला उपयोग आहे हे नुसतेच प्रकल्प नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे.

 विज्ञान साहित्य पर्यावरण यांच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन घडले पाहिजे, चांगले आहे ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. समाज परिवर्तन कसं होईल याच सातत्याने  छत्रपती शिक्षण मंडळ प्रयत्न करत असून ही स्वप्ने पुढच्या दशकाची असून नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया आतापासूनच रोवण्याची महत्वपूर्ण कार्य संस्थेचे सरचिटणीस डॉ.निलेश रेवगडे, सातत्यपूर्ण करत असून यामध्ये NEP समन्वयक उर्मिला जाधव, स्पर्धाप्रमुख अर्पिता कानेटकर,व अनेक शिक्षक गेली दोन वर्ष  समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हूणन त्यांचे व टीमचे अभिनंदन करतो एका विचाराने प्रेरित झालेले आपले शिक्षक समाज परिवर्तन कसे होईल याचा विचार करत आहेत म्हूणन याचा आम्हाला छत्रपती शिक्षण मंडळाचा खूप अभिमान वाटतो.

 दोन वर्ष विज्ञान साहित्य आणि पर्यावरण समाजापर्यंत पोहोचवण्याचेआपण कार्य करतोय. जे जे चांगले आहे ते शिक्षक विद्यार्थी  समाजापर्यंत पोहोचवू या त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढेल असा असा प्रयत्न करूया! मला याची खात्री आहे या विद्यार्थ्यांमधूनच भारत देशाचे भावी नेतृत्व तयार होणार असून याचा ओरिजनल विचार केला आहे आणि याच बरोबर  पुढल्या काळामध्ये अंतराळातील संशोधन टेक्नॉलॉजीमध्ये संशोधनाचा नेतृत्व छत्रपती शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेतलेला  विद्यार्थी करेल तरच खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती होईल असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात आपले मत व्यक्त केले.

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावर क्षमता प्रज्वलित करण्याची संधी :- उर्मिला जाधव NEP समन्वयक

विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बदल घडविण्याचे आपण साक्षीदार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने शैक्षणिक धोरणांमध्ये संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात बदल होणार आहेत यामध्ये भविष्यात कौशल्यधिष्टीत  असणार असून विद्यार्थ्यांच्या  सृजनशील विचारांना प्रेरणा देणारे असून विद्यार्थ्यांच्या शोधक वृतीला चालना देणारे व असणार आहे की ज्यामुळे भविष्यातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ सक्षम असणार आहोत. असे मत  NEP समन्वयक उर्मिला जाधव यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या की या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन समर्थपणे विचार करण्याची क्षमता, व समस्या निराकरण करण्याची क्षमता निर्माण होणार आहे कारण या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धती ही ज्ञान मिळवणे यापेक्षा या ज्ञान निर्माण करणे,याकडे वळली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला संधी देण्यात आली आहे.तुम्ही तुमची कौशल्य दाखवू शकता प्रेरित करू शकता तसेच विज्ञानाचे महत्त्व हे केवळ सिद्धांताच्या पुरता मर्यादित नसून  रोजच्या जीवनातील समस्या त्या प्रेरित करण्यासाठी त्याचे निराकरण करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून आजच्या वैज्ञानिक मंचावर आपण जे विचार शोध प्रकल्प सादर करणार आहोत ते फक्त शालेय शिक्षणासाठी प्रगती शिक्षणाची गरज नाही तर जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर तुमच्या मधील क्षमता  प्रज्वलीत करण्याची  संधी आहे असे मत NEP समन्वयक उर्मिला जाधव आपल्या प्रास्ताविकामध्ये मांडली

 सदर स्पर्धेमध्ये 42 निवडक विज्ञान प्रकल्प मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख अर्पिता कानेटकर यांनी केले तर बक्षीस वाचन जहिरा तडवी, यांनी केले तर फलक लेखन श्रीहरी पवळे यांनी केले  आभार प्रदर्शन मंजुळे सर यांनी केले. सदर या विज्ञान प्रदर्शनात  विद्यार्थ्यांकडून वैशिष्ट्यपूर्ण असे 42 प्रकल्प मांडण्यात आली होते यावेळी पालक, शिक्षक,  विविध शाळांचे  मुख्याध्यापक, तसेच छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्था पदाधिकारी उपस्थित होते. सदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा मोठ्या उत्साहात  नूतन विद्यालय कर्णिक रोड येथे संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog