खांब गावानजिक जीव घेणे खड्डे,

खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराला जाग येते काय?

प्रवाशी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया

                  गोवे-कोलाड (विश्वास निकम)मुंबई-गोवा हायवे वरील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील खांब गावाच्या बायपास रस्त्याच्या बाजूकडून सनी धाब्या जवळून कोलाड कडे जाणाऱ्या रस्त्याला प्रचंड मोठया प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला असून या खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदारा जाग येते काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.

       मुंबई-गोवा हायवे वरील रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम गेली बारा वर्षा पासून सुरु असून काम अद्यापही पुर्ण झाले नाही ही मोठी गंभीर समस्या आहे.व हे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री ही देता नाही.दोन महिना पूर्वी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढीव रक्कम ही मंजूर केली.परंतु तरीही या रस्त्याच्या कामाला सुरवात केलेली दिसत नाही.परंतु रस्त्याचे काम सुरु करणे राहिले दूरच ! पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेले नाहीत.

      एका महिन्यापूर्वी पुई नजीक असलेल्या महिसदरा नदीपुलावर मोठे खड्डे पडून टुव्हीलर स्वार जखमी झाला होता याची बातमी पेपर मधून आल्यावर हे खड्डे भरले.याच प्रमाणे चार दिवसापूर्वी पुगांव गावाजवळ दत्ताराम अधिकारी यांच्या ऊसाच्या रसाच्या टपरी जवळ रस्त्याला पडलेल्या मोठया खड्डयामुळे टुव्हीलर वरून पडून एक महिला जखमी झाल्यानंतर पत्रकारांनी याची दख्खल घेऊन खड्डयाचे फोटू काढून पेपर मधून बातमी दिल्यानंतर त्वरित हा खड्डा भरला गेला.परंतु खांब गावानजिक पडलेले खड्डे अद्याप भरले गेले नाहीत यामुळे काल या खड्डयातून प्रवास करतांना ऍक्टिवा स्लिप होऊन ऍक्टिवा चालक सुदैवाने किरकोळ जखमी झाला.या रस्त्यावर प्रवाशी जखमी झाल्यावर खड्डे भरले जातील काय? का ठेकेदार प्रवाशी जखमी होण्याची वाट बघत आहे काय अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog