Posts

Image
  कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,राम नवमीनिमित्त शोभायात्रा कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावर रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.तर प्रभू श्री रामाच्या रामनवमी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडले. आंबेवाडी कोलाड येथील श्री अंबर सावत मंदिर सभागृहात हिंदू संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आंबेवाडी कोलाड बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण भगवेमय आणि भक्तिमय झाले होते. सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी राम भक्तांकडून रामनवमी उत्सवाचे हे आयोजन करण्यात होते याचा उपस्थित राम भक्तांनी आनंद लुटला. शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक सजवून आणलेल्या बैलगाडीने सारेजण गेले भारावून  रामनवमीसाठी रामभक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कणा रांगोळी व फुलांची सजावट कारण्यात आली होती. तस...
Image
         गोरेगाव येथील कालभैरव जत्रा उत्सवात उंच खांबावरील लाट फिरवणे ठरत आहे मुख्य आकर्षण, भिनाड गावाच्या काठीला मुख्य मान     कोलाड (विश्वास निकम )  चैत्र महिना सुरु झाल्यानंतर कोकणात जत्रेची धामधूम खऱ्या अर्थाने होते.याप्रमाणे सालाबाद प्रमाणे गोरेगाव येथील काल भैरवनाथ जत्रा अनेक वर्षांपासून सुरु आहे.यावर्षी कालभैरवनाथाची जत्रा चैत्र चतुर्दशी मंगळवार ३१ मार्च  २०२६ रोजी आहे या जत्रेचा विशिष्ट आकर्षण म्हणजे उंच खांबावरील लाट फिरवणे हे असुन  या जत्रेमधील विशिष्ट मानाची काठी म्हणून भिनाडच्या काठीचा मोठा मान सन्मान असतो.       भिनाड गावाच्या काठीच्या मानामागे फार मोठा जुना इतिहास असुन तो इतिहास पूर्वीपासून चालत आलेली  प्रथा आहे. पूर्वी गोरेगावातील कालभैरवनाथाच्या जत्रेत लाट फिरवण्याच्या वेळी काही वाईट शक्ती अडथळा करत होत्या. तो इतिहास पूर्वीपासून असा सांगितला जातो की गोरेगावातील लाट फिरवत्या वेळी जो अडथळा येत होता तो दूर करण्यासाठी गोरेगावातील जानकार मंडळींनी काही आत्मज्ञान असलेल्या लोकांकडे विचारणा केली असता असे स...
Image
  ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मोबाईल साक्षरता' प्रशिक्षण संपन्न; आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे,इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडियाचा उपक्रम. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुका तसेच खांब विभागातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांना डिजिटल युगात सक्षम करावे, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था आणि आयएलसीआय (इंटरनॅशनल लोंजेव्हिटी सेंटर इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत कार्याल खांबच्या सभागृहात 'मोबाईल साक्षरता प्रशिक्षण' आयोजित करण्यात आले होते. याला येथील ज्येष्ठ नागरिकांना मोठा उत्सुर्त प्रतिसाद दिला. या महत्त्वाच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत सोनावणे आणि नंदकुमार सकट यांनी केले. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांसह ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलच्या विविध फिचर्सची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचा वापर, सुरक्षित डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सुरक्षितता आणि उपयुक्त अॅप्स कसे वापरावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला गावांतील ज्येष्ठ नागरिका...
Image
  खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सभा चिल्हे येथे मोठ्या उत्साहात संपन्न कोलाड (श्याम लोखंडे) कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत गेली सात दिवस मोठ्या उत्साहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन सोहळा तसेच जय जय राम कृष्ण हरीजागर मंत्र जप कीर्तन महोत्सव असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम चिल्हे येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात पंचक्रोशीसह उपस्थित सांप्रदायिक भक्तगणांनी श्रवण करत त्याचा आनंद लुटला.तर भक्तभावनेने संपन्न झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने याची सांगता सभा यजमान चिल्हे येथे शनिवारी २८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्...
Image
  मुंबई गोवा महामार्गांवर टेम्पोने घेतला पेट,  कोलाडच्या खांब गावा नजिक घटना, स्थानिकांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला!  कोलाड (विश्वास निकम )  मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब ग्रामपंचायती समोर ब्रिजवरुन गादी भरून जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला.असुन आजूबाजूच्या स्थानिक नागरिक यांनी धाव घेऊन प्रसंगवधान दाखवून  आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला असुन कोणतेही जिवीत हानी झाली नाही.   सोमवार दि.२३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२. ४५ सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून  खांब बाजुकडून कोलाड बाजूकडे गादी घेऊन जाणाऱ्या टेम्पो क्र. एम. एच ०४ के एफ १०५१  खांब ब्रिजवरून जात असतांना अचानक पेट घेतला. हे स्थानिक नागरिक व प्रवाशी वर्ग यांच्या लक्षात येताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली व प्रसंगवधान दाखवत आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला.याची माहिती मिळताच रेक्यू टीम दाखल झाली परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक यांनी आग आटोक्यात आणली.
Image
  आजचा  महाराष्ट्र टॉप १० न्यूजचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा रायगड भूषण पुरस्कार देऊन केला सन्मान!    कोलाड (विश्वास निकम )  आजचा महाराष्ट्र टॉप १० न्यूज’ या वृत्तपत्राचा पहिला वर्धापन दिन सोहळा दिनांक २२ मार्च २०२६ रोजी रोहा नगरपरिषद येथील जेष्ठ नागरिक सभागृहात सकाळी ११ वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाला.या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, तसेच वृत्तपत्राच्या यशस्वी तीन वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला.    या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १३ मान्यवरांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ११ ‘रायगड भूषण’ पुरस्कार, १ ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार’ आणि १ ‘समाज भूषण’ पुरस्काराचा समावेश आहे.तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या  पत्रकारांचा" पत्रकार गौरव पुरस्का...
Image
  १० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली!   सर्वहारा जन आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे  दोन मुलींची सुटका आई-वडिलांशी भेट   कोळसा मालक अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी! कोलाड (श्याम लोखंडे) गेल्या दहा वर्षांaपासून कोळसा भट्टीवर विटबिगारी करणाऱ्या वाघमारे कुटुंबाची अखेर छळातून सर्वहारा जनआंदोलनाच्या अथक पाठपुराव्यामुळे मुक्तता झाली असून, मालकाच्या ताब्यात असलेल्या मजुरांच्या दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी गळाभेट झाल्याचे समोर आले आहे. 'सर्वहारा जन आंदोलन' संघटनेने केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या मार्गदर्शाखाली संघटनेचे मुख्य पदाधिकारी सोपान सुतार यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती मूळचे वरवटणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले संतोष जानू वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता वाघमारे यांना दहा वर्षांपूर्वी अनिल चव्हाण (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याने कामासाठी कर्नाटक राज्यातील रायपूर येथे नेले होते. तेथे हे कुटुंब सतत ...