आपल्या मृत्यू नंतर ही आपले नाव जगाने घेतले पाहिजे असे जिवन जगा:-हभप प्रियाताई निकम कोलाड:- (विश्वास निकम) ज्या प्रमाणे आपल्या परिसरातील हभप पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ (बापू )यांनी समाजासाठी केलेले निस्वार्थी समाजकार्य यामुळे ते निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी समाजात जागृत आहेत. यामुळे जिवन जगत असतांना असे जिवन जगा कि आपण निघून गेल्यानंतर ही आपले नाव समाजात घेतले पाहिजे असे मत हभप प्रियाताई गणेश निकम यांनी हेटवणे येथील निकम भावकीच्या कुळदेवीच्या श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले. कुळीची हे कुळदेवी l केली ठायी संतांनी ll१ll बरवे जाले शरण गेलो l उगवलो संकटी ll ध्रु ll आणीला ही रुप बळे l करुनि खळे हरिदासी ll२ll तुका म्हणे समागमें l नाचों प्रेम लागलो ll३ll या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप प्रियाताई निकम यांनी सांगितले कि आमच्या कुळातील कुळदेवीची संतांनी माहिती करून दिली बरे झालो मी शरण गेलो त्यामुळे माझी संकटे नाहीशी झाली. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनी देवी...